ते बाळ आता मरणाची वाट बघतय.

हाे बाळच ते , सध्या त्याच्या वयाची ७६ री चालु आहे .
आजी तिच्या हाताने भरवते , आई , बाबा मिळुन अंघाेळ घालतात , आणि मग अंथरुणात ठेवल की हलत ही नाही, आणि बाेलत सुध्धा नाही.जाे माणुस तरूणपणात  कुणाचा वाकडा शब्द ऐकुन घेत नसायचा ,त्याच जीवन अस पराधिन झाल . मरणाची वाट बघत  ताे जीव वेदना सहन करताेय.

आपल्याच मरणाची वाट पाहान मनाला कीती बाेचनार असेल .  आजी सुद्धा  एक टक बघत असते, इतके दिवस ज्याच्या साेबत साेन्याचा संसार केला ताे साथीदार काही दिवसांचा साथी आहे   हे समजत असुनही   भावनेच्या सागराला  बांध घालन तिला कस  जमत  देवालाच ठाऊक.

"देवा , उचल रे बाबा .." अस म्हनेपऱयंत जगन कितपत साेसवेल सांगता येत नाही.  पण जितक मिळालय त्यात पाप पुण्याचा हिशाेब ठेवता आला की मग मिळवल सगळ. आशा फक्त एकच  जाताना असह्य वेदना नकाे .
"बालपन देगा देवा " अस  कितीही म्हटल आणि "म्हातारपन दुसर बालपन असत" हे कितीही खर पटनार असेल पन तरी देवा नकाेरे अस बालपन. आणि देवा एकच मागन पुन्हा कुणाला मरणाची वाट बघायला लावू नकाे.
     पुन्हा कुणाला मरणाची वाट बघायला लावू नकाे
     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ताे

आयुष्याच्या नव्या वळणावर